विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

राष्ट्र सर्वप्रथम _ सुरुवात स्वत:पासून !

विवेक जागवा ; देश वाचवा ! _ संपादक वृंदा आशय

मातृभूमीची आणि मातृभाषेची सेवा करणे हे प्रत्येकाचे नित्यकर्तव्य आहे. देश संकटात असताना ते आद्यकर्तव्य आहे. जागावे आईचे आईपण , बापाचे बापपण _ सांभाळावे कुटुंब आणि जागवावे आपल्या राष्ट्राचे भारतपण!

श्रीकृष्णार्पणमस्तु !


आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे !

भारताचे जीवितकार्य – ३२

दि. २९ जुलै १९६४

(श्रीमाताजींच्या भारताच्या नकाशामध्ये पाकिस्तान, नेपाळ, सिक्किम, भूतान, बांग्लादेश, ब्रह्मदेश आणि श्रीलंका यांचा समावेश आहे.)

अखंड भारताच्या त्या नकाशाबद्दल श्रीमाताजी म्हणतात : हा नकाशा भारत-पाकिस्तान फाळणीनंतर बनविण्यात आलेला आहे. वरकरणी कितीही बदल झाले तरी हाच खऱ्याखुऱ्या भारताचा नकाशा आहे. आणि लोकांना काहीही वाटले तरी, खऱ्याखुऱ्या भारताचा हा नकाशा असाच कायम राहणार आहे.

*

इ. स. १९६५

साधक : मला आशा आहे की, काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्या एकीकरणाच्या दिशेने टाकले गेलेले पहिले पाऊल असेल.
श्रीमाताजी : परमप्रज्ञेचे त्याकडे लक्ष आहे.

  • श्रीमाताजी (CWM 13 : 360, 366)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

India’s Life-Mission – 32

29.07.1964

(About “the Mother’s map of India”, which includes Pakistan, Nepal, Sikkim, Bhutan, Bangladesh, Burma and Sri Lanka. The “partition” mentioned in the first sentence below is that of Pakistan and India.)

The map was made after the partition. It is the map of the true India in spite of all passing appearances, and it will always remain the map of the true India, whatever people may think about it.

1965
Sadhak : I hope the trouble in Kashmir is the first step towards the unity of India and Pakistan.

The Mother : The Supreme Wisdom is seeing to it.

  • The Mother (CWM 13 : 360, 366)

Do visit and subscribe to our website auromarathi.org and YouTube channel AUROMARATHI.



https://share.google/yBSsWKS8ynBnwYOYt

मातृभाषेचा पोकळ अभिमान बाळगण्यापेक्षा गांभीर्याने अभ्यास करणे अधिक महत्त्वाचे आहे.



•|ॐ|•

ए जिंदगी!

ऐसे निकले थे जोश से

हम बाजार में ;

लेकर ‘विश्वबंधुत्व’ के सपने 

और एक दर्दनाक सच पता चला 

यहां तो कोई भी नहीं है अपने !

धीरे-धीरे एक ऐसा समय आया 

 जहां लोगों को – नहीं नहीं 

 इन्सान को ढूंढना पड़ा 

और एक दर्दनाक सच पता चला 

 यहां तो इन्सान है ही नहीं !

हे जिंदगी, हैरान हूं मैं 

तेरे मासूम सवालों से 

परेशान हूं मैं …..

ऐसा क्यों? कोई अपना नहीं 

हर कोई परायाही हो जाता है 

फिर एक समय आया 

चलो भाई, स्वीकृत कर लेते हैं 

अपने पराये सही;  इन्सान तो होंगे 

…………………..

किंतु वक्त बदलते ही वह

 पराये लोगों को भी 

‘वह हमारे नहीं है’, कहने लगे 

और हम दंग रह गए, ए जिंदगी!

इन्सान आखिर सच में किसका होता है?

 सत्ता, संपत्ति, कुर्सी, चाहत, स्वयं 

या फिर किसिका भी नहीं ?

यहां हर कोई गिरगिट जैसा रंग क्यों बदलता है भगवान?

 जो रूप गुण तूने दिए है उससे 

वह खुश नहीं क्या ?

क्या उन्हें भगवान भी दूसरा चाहिए ?

मुझे पता है अब तो आप भी हैरान हो गये भगवान !

….. किंतु मैं खुश हूं|कोई तो है मेरे साथ 

परेशानसा….

………………

इसे मजे में परेशानी कहूं 

या परेशानी में मजा 

क्या फर्क पड़ता है? 

जिंदगी तो है ही एक सजा! 

संपूर्ण समर्पण!

वृंदा आशय 

श्रीकृष्णार्पणमस्तु!


मरतात फक्त गांधी आणि फुले’

-दुर्गा भागवत 

गांधीजी छातीत गोळी खाऊन गेले. तोवर फाशीच्या तक्तावरच्या देशभक्तांची काही मरणे आम्ही पाहिली होती. उपवास करून मेलेल्या जतींद्र दासाचे मरण माहीत होते. रुग्णशय्येवर अनंतात विलीन झालेल्या टिळक, चित्तरंजन दास, सेनगुप्त, मोतीलाल वगैरे देशभक्तांची नैसर्गिक असली तरी त्या वेळी भव्यदिव्य वाटणारी मरणे आम्ही ऐकली होती, पाहिली होती. त्या प्रत्येक मरणाच्या वेळी मन आतूनबाहेरून हिंदकळले होते. पण प्रत्येक मरणात देशप्रेमाचा उत्स्फूर्त झरा कुठून तरी फुटत होता. आम्ही रडत होतो, डोळे पुसत होतो, नव्याने निश्चय करीत होतो. “आम्ही पण त्यांच्यासारखे होऊ. उंचीने नव्हे, पण गुणाने ” असे संकल्प रचीत होतो.

गांधीजींचे पहिले दर्शन झाले तेच मुळी टिळकांच्या अंत्ययात्रेत. वरून धोधो पाऊस पडत होता. पण जनसंमर्द चहूकडून लोटला होता. प्रथमच चौपाटीने स्मशानभूमीचे स्वरूप घेतले होते. पण सारी यात्रा कशी शांत शिस्तीत चालत होती. कारण अंत्ययात्रेचे नेतृत्व गांधींकडे होते. टिळकांच्या मरणाला उद्याच्या राष्ट्राच्या स्वतंत्र जीवनाचे स्वरूप त्यांच्या-मुळेच आले होते. मरणच इथे जीवनाच्या वाटेने शांतपणे चालले होते. त्या वेळी माणूस मेला तरी त्याचा आत्मा म्हणजे संदेश माणसातच राहातो हे मला जाणवले. टिळकांचा संदेश समजण्याचे ते वय नव्हते. पण गांधींचे शब्द मात्र तेव्हापासून आपलेसे वाटू लागले. कारण गांधी कुणालाही समजेलसे बोलत. टिळक कधी बालमनात सामावले नाहींत. पण गांधी सहज मुलांत मूल बनत. त्यांचा माझा परिचय नव्हता. कधी झाला नाही. पण वाऱ्याबरोबर झाडाचे पान सळसळते तसे त्यांच्या वाणीबरोबर माझे मन सतत आंदुळत राहिले.

गांधींचा घरगुतीपणा जाणवे. कारण जे जे बायकामुले करीत ते ते स्वतः रस घेऊन ते करीत. ते सूत कातीत, धुणी धूत, रांधीत, वाढीत, झाडीत, आजाऱ्याची सेवा करीत, मुलांबरोबर हसत, खेळत, स्त्रियांना समान लेखून राजकारणात ओढत, अशिक्षितांना हसत-खेळत शिकवीत आणि शिवाय व्याख्याने देत, लेख लिहीत. इंग्रजीत सुंदर लेख लिहीत आणि ब्रिटिश राज्य उलथून टाकायच्या गोष्टी पण बोलत. यातले बरेचसे सर्वसामान्य माणूस करतो तसेच होते. ते म्हणाले, “सूत काता नि मला द्या. खादी मला द्या म्हणजे मी तुम्हांला स्वराज्य देतो.” भारतात सात लाख खेडी आहेत हे त्यांनीच आम्हांला सांगितले. या खेड्यांना पोचण्याचा मार्ग म्हणजे एकच खादीचा. सूत काढणे पोरासोरांना जमण्यासारखे होते. खादीकेंद्रे राजविद्रोहाची राष्ट्रीय केंद्रे वाटू लागली. हा राष्ट्रसेवेचा सोपा मार्ग पटू लागला. सूत काढायचे, खादी वापरायची, स्वदेशीचे कडकडीत व्रत घ्यायचे. ही नवी व्रते जुन्या व्रतवैकल्यांहून वेगळी असली, तरी त्यांतले व्रतपण जुन्याला तोडणारे नव्हते, तर जोडणारे होते. केवळ स्त्रीच व्रते करते असे नव्हे तर आता मोठमोठे लोकही हे व्रत करताहेत, तेच आपण करतो, हा धीर, हा अभिमान मनाला वाटू लागून ते फुरफुरू लागले. मन लावून मी गांधींचे बोल ऐकू लागले. लेख तन्मयतेने वाचू लागले. गोखल्यांनंतर सुंदर इंग्रजी गांधींनीच लिहिले. आमचे गोखले त्यांचे गुरू. गांधींचे आत्मचरित्र इंग्रजीतून वाचले. तेव्हाचा कृतार्थतेचा भाव अजून आठवतो. दिवाकरांच्या नाट्यछटेतल्या मुलाप्रमाणे मी त्या वेळची शाळकरी पोर इथेतिथे सांगत सुटले, “अहो, मलाही इंग्रजी मोठं पुस्तक वाचता येतंय. गांधींचं आत्मचरित्र मी वाचलंय बरं का!” त्या चरित्रातले गांधींनी केलेले गोखल्यांचे वर्णन मला नितांत सुंदर वाटले. गोखले कोकरासारखे निष्पाप होते हे त्यांचे वर्णन मी कधी विसरले नाही. अद्यापही कोकरासारखी निष्पाप वृत्ती मला फार प्रेरक वाटते.

गांधींनी मोठ्यामोठ्या लोकांना खूप वेड्यावेड्या गोष्टी करायला लावल्या. शेती करणे, साफसफाई करणे, हातमागावर विणणे, खादी नेसणे, डामडौलाचा त्याग करणे, तिसऱ्या वर्गातून प्रवास करणे, हिंदीत बोलणे, अस्पृश्यता न मानणे, स्त्रीपुरुषांनी सार्वजनिक कामात सहकार्याने वागणे, सामुदायिक प्रार्थना, हिंदु-मुस्लिम ऐक्य, काय नि किती म्हणून सांगावे ? आणि त्या काळचे मोठमोठे पंडित, राजकारणी, धोरणी, श्रीमंत हे सारे कार्यक्रम भारून गेल्यासारखे करू लागले. आज हे मलाच बालिश वाटते. पण ते भारून गेलेले वातावरण मात्र कधीच बालिश होणार नाही. इतका काळ साऱ्या राष्ट्राला अशा भारलेल्या स्फूर्तिप्रद वातावरणात ठेवणारा गांधींसारखा नेता आम्हांला लाभला नि आम्ही भारलो गेलो हे केवढे आमचे भाग्य. धर्मानुभवाच्या, प्रेमानुभवाच्या कसोट्या गांधींनी राजकारणाच्या अमूर्त कार्याला लावायला आम्हांला शिकवले. कोणत्याही लहानमोठ्या कार्यात उत्कट भावानुभव घेता येतो हे त्यांनी आम्हांला शिकवले. गांधी गेले आणि क्षेत्रे विभागली. फिरून राज-कारणात तो धर्मानुभव घ्यायला कुणीच समर्थ मन राहिले नाही. गांधी ते भावजीवन घेऊन गेले. त्यांचा तो स्वाभाविक प्रकाश होता. आमच्यात तो काही काळ परावर्तित झाला होता. भावजीवन हे माणसाला किती आवश्यक असते नि त्याचे उन्नयन कसे करायचे हा माझ्या मते गांधींनी राष्ट्राला शिकवलेला अमोल धडा आहे.

वास्तवाचे, क्रूर सत्याचे दर्शन अविचलितपणे गांधी स्वतः घेत आणि त्या सत्याला सामोरे जात. कारण त्याना व्यक्तीबद्दल शत्रुत्व नव्हते. व्यक्तीकडून घडलेल्या बऱ्या-वाईट कृतींवरचा उतारा त्यांना माहीत होता. तो म्हणजे प्रेम, आणि आपले म्हणणे संयमित शब्दांत पण मूळ मुद्दा न सोडता सांगण्याची त्यांची हातोटी. प्रतिपक्षाला शब्दांची हाणामारी त्यांनी कधी केली नाही. भल्याभल्यांना त्यांनी या विनम्र वृत्तीने आपलेसे केले. गांधींच्या वाणीतली रसाळ काव्यमयता इथेच फार जाणवते. मला चांगले आठवतेः टागोर व गांधी यांचा वाद चालला होता. टागोरांना गांधींचा असहकार त्या वेळी पसंत नव्हता. एकदा एका लेखात त्यांनी टीका करताना वनवासी सीतेचा उल्लेख केला होता. त्याला उत्तर देताना गांधी म्हणाले, “खादी हीच माझी सीता आहे. तिला खेडोपाडी धुंडीत मी हिंडतो आहे.” महाकाव्याने होणार नाही एवढा परिणाम या वाक्याने माझ्या मनावर केला. टागोर आमचे आवडते कवी. पण त्यांची सारी विधाने मी तत्काळ विसरले. परंतु गांधींची खादी-सीता मात्र विसरले नाही. साहित्याचे मूल्य सत्यमय-प्रेममय, त्यागी वृत्तीच्या आविष्कारामुळे किती वाढते ते मी रोजरोज शिकत होते.

गांधींची चळवळ जोरात चालू होती. आम्ही तिच्यात होतो. त्या वेळी अण्णासाहेब कर्वे आमच्या घरी आले व माझ्या आजोबांना म्हणाले की, “बायकांच्या शिक्षणासाठी मी धडपडलो. त्यांच्यासाठी संस्था काढल्या. पण गांधींनी जी स्फूर्ती खेडोपाड्यांतल्या बायकांनाही दिली तशी मला शहरातल्या माझ्या संस्थेतल्या मुलींनाही देता आली नाही.” गांधींनी भारतातल्या स्त्रियांना जागवले. त्यांनीच आम्हांला सांगितले की, तुम्हांला पुरुषांच्या बरोबरचे अधिकार आहेत. पण तुम्हांला पुरुषांसारखे धाडसही केले पाहिजे. तसेच कष्ट उपसले पाहिजेत. पुरुषांवर अवलंबू नका. स्वतंत्र जगा. कुटुंबात सुद्धा प्रत्येकाला स्वतंत्र आणि तरीही एकत्र जगता येते. स्वतंत्र एकत्र जीवनाचा हा धडा किती अमोल आहे हे अनुभवाशिवाय समजायचे नाही. पतित स्त्रियांनाही गांधींनी तुच्छ लेखले नाही. वेश्यांच्या समोर, “आम्ही पुरुषांनीच तुम्हांला अधोगतीला नेले आहे” म्हणून युगानुयुगीच्या अपराधाबद्दल शरमिंदे होऊन गांधींनी घळघळा आसवे गाळली. हा प्रसंग वाचला आणि सारे शरीर व मन तुडुंब उचंबळले. त्या दिवसापासून वेश्यांकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली. बायकाच पतितां-बद्दल अधिक क्रूर बनतात. शीलवान स्त्रीला अशा बायकांपुढे आपल्या पातिव्रत्याचा तोरा मिरवायला फार आवडते. पण तेव्हापासून चांगल्या समाजात जन्मल्यामुळे हे केवढे अमोल धन आपल्याला मिळाले आहे आणि आपल्या किती बहिणी त्यापासून वंचित झाल्या आहेत हे सतत भासू लागले. तमासगीर बायकांत वावरताना त्यामुळेच मला जड गेले नाही. मी त्यांच्यात मिसळू शकले. हे कसब गांधींमुळेच प्राप्त झाले यात शंका नाही.

गांधींचे कान खूप मोठे म्हणजे विद्रूप होते. एकदा तर स्वतःचा फोटो पाहून ते हसले न म्हणाले, “मी किती कुरूप प्राणी आहे तरी!” पण एकदा मी एका भरतकलाशिक्षकांकडे भरतकाम शिकत होते. त्या वेळी मोगा रेशीम नुकतेच खादीभांडारात येऊ लागले होते. मी ते खरेदी केले. त्या लड्यांनी मला केसांचे भरतकाम करतात तसे गांधींच्या प्रतिमेचे भरतकाम करायचे होते. मास्तरांनी गांधींच्या काही प्रतिमा पुढे ठेवल्या. भरायला चेहऱ्याचीच प्रतिमा सोयिस्कर होती. पण मास्तर कलावंत होते. ते म्हणाले, “पाहिलीस ही पाठ ? या माणसा-सारखी सुंदर पाठ मी अजून पाहिली नाही. मानवतेच्या कष्टांचे ओझे उचलण्यासाठीच जणू ही भक्कम सुबक पाठ विधात्याने निर्माण केली आहे. हिला तोड नाही.” पुढे एकदा एका प्रार्थनेच्या वेळी गेले होते. त्यांच्या मागे बसून ती उघडी पाठ मी बघतच राहिले. वृद्धाची ती पाठ होती. पण तिच्या स्नायूस्नायूत रेखीवपणा होता. दाराजवळ शेकडो पादत्राणे पडली होती. गांधींच्या चपलासुद्धा होत्या. केवढ्या मोठ्या होत्या त्या. दुसऱ्या कुणाच्याच चपला एवढ्या मोठ्या नव्हत्या. माझे लक्ष त्यांच्या पायांकडे गेले. त्यांची पावले ही पाठीसारखीच मोठी व प्रमाणबद्ध दिसली. हे पाय फिरतील तिथे ठसे उमटवतील हे उघडच होते.

येरवड्याच्या तुरुंगात गांधी उपोषण करीत होते. डॉ० आंबेडकरांवर त्या उपोषणाची समाप्ती अवलंबून होती. तोच निर्णयाचा दिवस. गांधींची प्रकृती बरी नाही अशी वार्ता आली. जनता भोळ्या श्रद्धेने चौपाटीवर जमली. संध्याकाळ झाली होती. अकाल अभ्रे दाटून आली होती. पण पाऊस पडत नव्हता. सारेच वातावरण कोंदटले होते. प्रार्थना कुणीतरी म्हणाले. जमाव मागून री ओढीत होता. मला म्हणवेना. मटकन मी खाली बसले. कुणी म्हणाले, “पोलीस येताहेत.” प्रार्थना संपवून जमाव पांगत होता. कुणी एक स्वयंसेवकच जवळ आला व म्हणाला, “अहो, उठा की. लोक तुडवतील ना !”

“तुडवू देत !” मी म्हटले. तो हताश होऊन निघून गेला. माझ्या घशात आवंढा आला. गांधी मेले तर आपण तरी जगायचे कशाला? इतक्यात ढग लाल झाले. लालपिवळा प्रकाश पडला. समुद्राचे पाणी भरतीला लागले. मनातले सावटही पांगले. मन म्हणाले, “गांधी कधी मरतील का? शक्यच नाही. मरूनही ते उरतील.” गांधी काही त्या वेळी मेले नाहीत. पण ज्या दिवशी ते गेले त्या वेळी, त्या संध्याकाळी झाडांवर फुले डवरली होती. मन म्हणाले, आजचे प्रत्येक फूल केवळ गांधींसाठी फुलले आहे. हे फूल फुटके नशीब म्हणून प्रेताला शृंगारीत नाही आहे. ते गांधींबरोबरच सुकायला, मरायला टवटवले आहे, घमघमले आहे. फुलेच गांधींबरोबर सती गेली. तेवढीच गेली. माणसे मागे उरली, पण सारे गांधींचे तेवढे होमून आपापला क्षुद्र स्वार्थ जगवीत उरली. कितीतरी मोठी माणसे भारतात त्यांच्यानंतर झाली व गेलीदेखील. भली माणसे आम्ही खूप पाहिली. पण महारोग्याच्या वेदनेत सहभागी होणारा, दुःखाचे स्वागत करा असे सांगणारा, देशासाठी कराल तेवढे बलिदान थोडे असे ओरडून सांगणारा, दरिद्रनारायणाचा पूजक, आणि शेवटी सारी सत्ता सोडून बाजूला राहून सतत कार्यरत होऊन राहाणारा नेता गांधींसारखा पुन्हा होणे नाही. भारतात वेदांती, ज्ञानी, तत्त्वज्ञानी, थोर संत, वीरपुरुष उदंड झाले, पण समाजकार्यात असे कौशल्य ओतून सेवेला एवढा महान दर्जा आणून देणारा आदर्श समाजसेवक मात्र इतिहासात हाच पहिला झाला.

नुकतीच साबरमतीला गेले होते. तिथे गांधींच्या प्रार्थनास्थळाचे दर्शन घेतले. वाळू मऊ होती. सारे स्वच्छ होते. नदी वाकडी वळणे घेतलेली अशी कोरडी ठणठणीत पडली होती. पण गांधी तिथे नव्हते, म्हणून प्रार्थना नव्हती. पक्षीच बोलत होते, पण त्यांचे बोल कुणाला समजत नव्हते. नुकत्याच मी आत त्यांच्या वस्तू पाहिल्या होत्या. त्यांत एका पत्राचा लिफाफा होता. वर लिहिले होते, “महात्मा गांधी, भारत देश, जिथे असतील तिथे.” ते वाचले आणि पोटात ढवळले.

” जहां हो वहां.” जिथे असतील तिथे. गांधी कुठे असतील तेथे जाणारे ते पत्र त्यांच्या-पर्यंत पोचले. पण आता मात्र गांधी असतील तिथे तर कुणी पोचू शकणारच नाही, पण इथेच राहिलेल्या त्यांच्या संदेशातल्या एकाही अक्षराजवळ आम्ही पोचू शकणार नाही. त्यांनी दिलेले आम्ही सारेसारे घालवून बसलो आहो. त्यांच्या-आमच्यांतले अंतर अतूट झाले आहे. या साबरमतीच्या वाळूच्या चौकात त्यांची पावले कुठे राहिली आहेत आता ? गांधी एकटेच गेले. आम्ही जगतो आहोत. स्वतःलाच स्वतःच्या कर्तृत्वाची महती पटवीत जगतो आहोत. खूप जगणार आहोत. मरतात फक्त गांधी आणि फुले.

ज्येष्ठ विचारवंत कै. दुर्गा भागवत यांच्या ‘युगात्मा’ या पुस्तकातून साभार


स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील लेखात ‘जीवनवेध’ या आपल्या व्यक्तिचित्रणपर पुस्तकामध्ये ‘जातीय राजकारणाबाबत’ लेखक जनार्दन वाघमारे लिहितात,

” भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्थिक व सामाजिक प्रश्नांची व्याप्ती, उग्रता व गुंतागुंत अधिकच वाढली . भारतीय लोकशाहीचा सर्व डोलारा नोकरशाहीवर व पक्षीय राजकारणावर अवलंबून राहू लागला. जवळपास सर्वच राजकीय पक्ष जातीयवादाच्या आश्रयाने राजकारण करू लागले आणि म्हणूनच त्यांना या देशाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनता आले नाही. जातीच्या आधारावर सत्ता मिळू शकते पण आर्थिक व सामाजिक बदल घडवून आणता येत नाहीत. शेवटी सत्ता मिळविणे व तिचा भरपूर उपभोग घेणे याशिवाय दुसरे कसलेही प्रयोजन जातीचा आधार घेऊन सत्तेवर आलेल्या पक्षासमोर उरत नाही. हा अनुभव आता जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांच्या पदरात पडलेला आहे. आमची सांसदीय लोकशाही भरडली गेली ती अशा राजकारणामुळे. ज्या संसदीय लोकशाहीचा आम्ही श्रद्धेने अंगीकार केला तिच्या मर्यादा अल्पावधीतच प्रकर्षाने जाणवू लागल्या. जनतेमध्ये परावलंबी प्रवृत्ती अधिकच प्रमाणात वाढल्या आणि विस्तारल्या. सामाजिक परिवर्तनाचे कार्य जवळजवळ बंदच पडले. ज्या समाज रचनेचे स्वप्न जयप्रकाशजींनी पाहिले होते ते दुभंगू लागले.”

‘जीवनरेखा’ – या व्यक्तिचित्रांच्या पुस्तकातून साभार! 


आत्मसत्ता !

होऊन वृत्ती – प्रवृत्तींचे घर्षण 

जेथ सुखाचे वर्षण 

दुःखाचे अवर्षण 

षडरिपूंच्या पलीकडे जाता 

घडते रे कृष्णाचे दर्शन !

कृष्ण भेटाया 

नाही व्हावे लागत 

मीरा आणि राधा 

कृष्णाला माझ्या हवा

फक्त भक्तिभाव  साधा !

कसली सत्ता, कसली मत्ता 

उडवितो कित्येक राजसत्ता

गिरवूनी संस्कृतीचा कित्ता

त्या परमात्म्यासी भेटाया 

साधावी आत्मसत्ता !

भेटता आत्मा-परमात्म्याशी

हे सत्य तू जाणसी

येथे कृष्ण धरे चक्र 

अन्  राम धरी कोदंड

राजदंडापेक्षा नित्य श्रेष्ठ धर्मदंड!

वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!


कृष्णादेश

जी सत्ता सत्याच्या प्रांताकडे नेत नाही तिला आत्मसत्ता मानणाऱ्यांनी स्पर्शही करू नये.

श्रीकृष्णार्पणमस्तु!


संपूर्ण समर्पण !

यावर आपले मत नोंदवा